Rahul Gandhi 
देश

गरीबों का शोषण, ‘मित्रों’ का पोषण, यही है मोदी जी का शासन - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा

मोदी सरकारने गेल्या काही दिवसात कृषी क्षेत्र आणि ओद्योगिक क्षेत्र या दोन्हीही क्षेत्रांत आमुलाग्र बदल घडवणारे बदल काही कायद्यांमध्ये केले आहेत. यामध्ये कृषी क्षेत्राशी संबधित तीन विधेयकं मोदी सरकारने पारित केली असून काल मोदी सरकारने कामगार कायद्यात दुरुस्त्या करणारे विधेयक संसदेत पारित केलं. यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

कामगार कायद्यात दुरुस्त्या करण्यासाठीचे विधेयक मोदी सरकारनं संसदेत मांडलं होतं. तब्बल 17 वर्षांनी या कामगार कायद्यात बदल करण्यात आले आहेत. या दुरुस्त्यांनुसार 40 हून अधिक कामगार कायद्यांना या चार संहितांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. 

राहुल गांधी यांनी या दुरुस्तीसंदर्भात ट्विट करत टिका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शेतकऱ्यांनंतर आता कामगारांवर हा वार आहे. गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन... अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींच्या एकूण कार्यपद्धतीवर टिका केली आहे. सोबतच त्यांनी एका हिंदी बातमीचं कात्रण जोडलं आहे, ज्यात या विधेयकाबाबत माहिती आहे. 

यापूर्वीच वेतन संहितेला मान्यता देण्यात आली आहे. व्यावसायिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि सामाजिक सुरक्षा अशा तीन संहितेतील हे बदल आहेत. नव्या बदलांमुळे तयार झालेल्या धोरणानुसार कामगारांची भरती अथवा कपात, कामाचे एकूण तास, कामगारांचा संप आणि कामगारांच्या नोकरीचा काळ अशा अगदी महत्वाच्या मुद्यांवर प्रभाव टाकणारे हे बदल आहेत. मात्र, या बदलांमुळे कामगार संघटनांचा असलेला प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

काय आहेत बदल?

- राज्यसरकारची परवानगीशिवायच 300 कामगारांची क्षमता असणाऱ्या कंपन्यांना कामावरुन काढून टाकण्याचा अधिकार या कायद्यान्वये मिळणार आहे. 

- 60 दिवस आधी सूचना दिल्याशिवाय कामगारांना संप करता येणार नाहीये. यामुळे संप करण्याच्या कामगारांच्या अधिकारावरच बंधने येणार आहेत. याआधी फक्त सार्वजनिक सेवाक्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना हा नियम लागू व्हायचा. जीवनावश्यक सेवेकरींना दिड महिन्यांची पूर्वसूचना देणे बंधनकारक असायचे. मात्र आता या कायद्यान्वये, सर्व क्षेत्रातील कामगारांना हा नियम लागू झाला आहे. 

- ज्या कंपन्या या अॅपवर आधारित आहेत त्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. त्यामुळे आता झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT